‘वर्षा’वर रात्री दोन तास खलबतं, कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रविवारी रात्री उशिरा बैठक पार पडली. दोन तास झालेल्या या बैठकित राज्यातील विविध विषयांवर खलबतं झाल्याची माहिती समोर आलीय.रात्री ११ वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस ‘वर्षा’वर पोहोचले. यात दोन्ही नेत्यांमध्ये प्रभादेवीतील राड्याचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता असं सांगण्यात येतंय.

प्रभादेवीत शिंदे आणि ठाकरे गटातील राड्यानंतर राज्यात परिस्थिती बिघडू नये, यासाठी काय मार्ग काढता येईल यासाठी खलबतं झाल्याची माहिती समोर आलीय.तसंच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतील मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुनही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येतेय.याशिवाय गृहविभागतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत, त्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.