आमदार संतोष बांगर यांना मोठा धक्का !!

शिवसेनेने बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई केली आहे.बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. संतोष बांगर यांनी बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती.
स्वाभिमानाने जगा, असा सल्ला बंडखोर आमदारांना बांगरांनी दिला होता. तसेच बंडखोरांचे काही चांगले होणार नाही. त्यांना नागरिक रस्त्याने फिरू देणार नाहीत. त्यांच्यावर सडके टमाटे, अंडे फेकतील. त्यांच्या तोंडाला काळे लावतील, असेही ते जोशात बोलण्याच्या ओघात बोलून गेले होते. ईडीच्या भीतीनेही अनेक आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र माझ्यामागे अशी ईडी लावली असती तर तिला काडी लावली असती, असेही ते म्हणाले होते. मात्र विधानसभेत शिंदे सरकार विश्वासमत प्रस्तावाला सामोरे जात असतानाच अचानक संतोष बांगर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले होते. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला आणि ते दुसऱ्या दिवशी थेट शिंदे गटाच्या आमदारांच्या बसमध्ये दिसले होते. त्यानंतर आता संतोष बांगर यांना शिवसेनेचा मोठा धक्का दिला आहे.