होमवर्कला सुट्टी? राज्य सरकार गृहपाठ बंद करण्याच्या विचारात!

राज्य सरकार आता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेणार आहे  शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे की, मुलांवर अभ्यासाचे ओझे देऊ नये. मुलांच्या मेंदूचा विकास झाला पाहिजे. तसेच गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असता कामा नये. शिक्षकांनी  विद्यार्थ्यांनी कमी वेळात पटकन समजेल असे शिकवावे, जेणेकरून त्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही. हा मोठा निर्णय असून हे माझ व्यक्तिगत मत आहे. याबद्दल शिक्षक संघटना, संस्था चालक त्यांच्याशी बोलणार आणि मग त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे.

दुसरीकडे होमवर्क नसेल तर विद्यार्थी घरी देखील अभ्यास करणार नाहीत. त्यामुळे या निर्णयाला विरोध देखील होण्याची शक्यता आहे. यावर पालक आणि तज्ञांकडून काय प्रतिक्रिया येतात हे पहावे लागेल. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.