शिंदे-फडणवीस सरकारने ‘हे’ निर्णय बदलले !

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. आता नवं सरकार आल्यानंतर आधीच्या सरकारचे निर्णय बदलणार की ते तसेच रहाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यानुसार या नव्या सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

कोणते निर्णय बदलले?

शिंदे-फडणवीस सरकारने आल्या आल्या ‘आरे’ मध्येच मेट्रो कारशेड होणार असल्याचं राज्यातच्या महाधिवक्त्यांना कळवलं आहे. आरेमध्येच मट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्त्यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती कळते. दुसरी महत्वाची माहिती म्हणजे राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याबाबत नव्या सरकारने निर्णय दिले आहेत.

मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ झाला होता. याविरोधात बरेच नागरीक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजुरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.जलयुक्त शिवार योजना हा फडणवीस सरकारचा मोठा प्रकल्प होता. या योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकार असताना सातत्याने झाले. त्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. मात्र आता फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आदेश दिले गेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.